स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

स्वातंत्र्य ???

आज १५ ऑगस्ट. हिंदुस्थानभर स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय.  सर्वप्रथम सर्व वाचकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.

मला एक प्रश्न पडलाय आपण खरच स्वतंत्र झालोय कां ?

हा प्रश्न पडायला आजची सामाजीक परिस्थीती कारण आहे. आपण हो आपणच आज बरेच प्रश्न तयार करुन ठेवले आहेत. मी म्हणणार नाही कि या सर्व प्रश्नांना राजकीय नेते जबाबदार आहेत, आपणच त्यांना निवडून दिले आहेना.

आज भ्रष्टाचाराने सारा देश पोखरलाय. कॉमनवेल्थ खेळ याचे ताजे उदाहरण आहे. साधा टॉयलेट पेपर चार हजार रुपयांना ! त्यापेक्षा पॅंटेत कार्यक्रम करुन नविन पॅंट स्वस्तात पडेल !

कुठेही सरकारी कार्यालयात जा पैसे खाऊ घातल्याशिवाय काम होतच नाही. ज्याची पैसे खाऊ घालायची ताकद नाही त्याने काय कराव.

खालील प्रश्नांचा विचार करुन सांगा स्वातंत्र्यदिन का साजरा करावा.
१. शेतकरी अजुनही (शासनाने अनुदान दिल्यावरही) रोज आत्महत्या करतोय. घोषीत अनुदाना पैकी शेतकर्‍यांना किती पोहोचले ?
२. विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत उभा राहुन वैतागला आहे.
३. आदिवासी अजुनही उपासमार सहन करतायत.
४. शिक्षक शिकवण्यापेक्षा निवडणूका, जनगणनेच्या कामात व्यस्त आहेत. मंत्र्यांच्या शाळा कॉलेजात तर शिक्षक बेठबिगारी बरी असेच वागवले जातात. शिक्षण सेवक नावाचा मोठा भ्रष्टाचार जोरात चाललाय. तीन हजारात शिक्षकाने आपले घर कसे चालवाव ?
५. महागाईने सामान्य जनता बेजार आहे.
६. कोणत्याही गावात / शहरात रस्त्यांची स्थिती बघा. चंद्रावर चालणे सोपे वाटावे.
७. राजकारणाने निचतम सीमा गाठलीय. मंत्री राज्यासाठी की राज्य मंत्र्यासाठी असाच प्रश्न पडावा. सर्व राजकिय पक्षांचे साटेलोटे आहे व सामान्य जनता सैरभैर झाली आहे.
८. साथीचे रोग फैलावत आहेत व ज्यांच्या कडून समाजाला काही अपेक्षा आहेत ते डॉक्टर आपले खिसे भरण्यात मग्न आहेत.
९. रस्त्यांची स्थिती खराब असतानाही टोल नाके दिवसेंदिवस वाढतच आहे.
१०. अन्न पदार्थां मधली भेसळ भयानक रुप धारण करित आहे.

वेळ आली आहे सामान्य जनतेने शहाण होऊन एकत्र येऊन असल्या परिस्थीतिशी दोन हात करण्याची.

तर आणि तरच हिंदूस्थान स्वतंत्र झाला असे म्हणता येईल.

गुरुवार, ८ जुलै, २०१०

महाराष्ट्राची प्रगती !

          सर्वांना माहितच आहे महाराष्ट्रात आघाडी सत्तेवर आहे. हो आघाडी म्हणजेच कॉंग्रेस व (अ)राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी. सत्ता  आघाडीची असली तरी सर्व "मलईदार" खाते (अ)राष्ट्रवादी कडे आहेत ही कॉंग्रेसची पोटदूखी.
          महाराष्ट्राची या आघाडीमुळे फारच प्रगति होत आहे असे आघाडीतल्या घटक पक्षांचे म्हणणे आहे, जे आम्हाला १०० % मान्य आहे. आघाडिच कामच तसे चाललय तर आम्हाला मान्यच कराव लागणार ना ! आमचाही नाईलाज आहे !
           या आघाडीने बरेच प्रश्न सहजच सोडवलेत आणि आम्हाला याचे खरच फार्फार कौतुक वाटते. उदाहरणार्थ काही प्रश्न कसे सोडवलेत ते बघुया.
१. शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी झाल्यात कारण आपण आत्महत्या केल्यावर आपल्या परिवाराची फरफट फारच वाढते हे त्या शेतकर्‍यांना कळले. अन्यथा मदत मिळवण्यासाठी या आत्महत्या वाढल्या असत्या.
२.   पूर्णवेळ शिक्षणमंत्री नेमला असता तर कदाचीत दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न कैक पटिने वाढला असता, त्यामुळे शिक्षण मंत्री नेमलाच नाही. हे सरकार एवढे समर्थ असताना नागरिकांनी शिकायची काय गरज आहे ? त्याच प्रमाणे उच्च  व तंत्रशिक्षण मंत्री आपले खाते यशस्वीपणे सांभाळतायत. सहावा वेतन आयोग दिल्यास अभियांत्रिकी शिक्षक वर्गात समाधानकारक शिकवतील विद्यार्थी उत्तिर्ण झाल्यावर अभियंते मोठ्ठ्या प्रमाणात वाढतील व समाजात बेकार अभियंते वाढतील त्यापेक्षा त्यांना वेतन आयोग न दिल्यास नाराजीने शिकवणे थांबेल बेकार अभियंते कमी रहातील व नागरिक सामान्यच रहातील.
३.  महाराष्ट्रात धर्मांध म्लेच्छांकडून बर्‍याच दंगली घडवण्यात आल्या. याचा ईतिहास सर्वांनाच चांगला माहित आहे. या दंगलींना हिंदूंकडून विरोध व्हायचा, हिंदूच जर विरोध करण्यास असमर्थ ठरले तर ? विरोध न झाल्यामुळे दंगली कमी झाल्या व म्लेच्छ कसेही वागायला मोकळे झालेत व दंगली कमी झाल्या.
    आता काय आपले पॉवर साहेब तर ICC चे अध्यक्ष झाले. साहेब महाराष्ट्राचे असल्याने महाराष्ट्र नं १ झालाच ना ?
तर रडू नका परत फूडच्या निवडणुकीत याईलेच निवडून आना वा आपले प्रस्न विसरुन जा साहेबांनो.

बुधवार, १६ जून, २०१०

मराठी.

मराठीचा मुद्दा हा रजकीय असुच शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष हा मुद्दा पळवू शकत नाही. मराठी माणसे दाक्षिण्यात्यांसारखे कायम राजकारणाचा विचार करित नाही पण आपसात वागतांना मात्र एखाद्या राजकारण्यासारखे वागतात. हेच कारण आहे आज प्रत्येक जण उठतो व मराठी मराठी करित सुटतो.
मी गेली बरिच वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी मराठी या मुद्यावर लिहीत आलो आहे. पण काही मराठी ब्लॉग्स वर मराठी या विषयावर वाचल्यावर माझ्या डोक्यात ही पोस्ट लिहायचा विचार आला. या लेखाचा उद्देश कोणालाही कमी लेखण्याचा किंवा डिवचण्याचा नाही.
मी भारतात बर्‍याच राज्यांमधे फिरलेलो आहे. फिरतांना माझी काही निरिक्षणे खालील प्रमाणे आहेत मराठी वाचकांनी प्रामाणीक पणे यांचा विचार करुन यापुढे निदान महाराष्ट्रात तरी केवळ मराठीतच संवाद साधावा.
इतर राज्यातील निरिक्षणे :
१. सर्व राज्यात तेथील लोकांना त्यांच्या भाषेचा अभिमान असतो व ते वागताना तसे दाखवतात.
२. तेथील बहुतेक व्यवहार स्थानीक भाषेतच केले जातात.
३. त्यांचे स्थानीक दोन माणसे भेटलीत तरिही ते आपल्या उपस्थितीत सुद्धा त्यांच्या भाषेतच बोलतात.
४. सर्वच परराज्यातील माणसे आपल्या भाषेच्या माणसांना कोणत्याही बाबतीत अग्रक्रम देतात.

मी गेली काही दिवस मुंबईतील  FM चॅनेल्सवर लक्ष ठेवून आहे. बहुतेक चॅनल्सवर मराठी गाणी वाजवण्यात येत नाहीत किंवा त्यांच्या वेळा मराठी माणसांना सोयीच्या नाहीत. यावर उपाय मी माझ्या साठी शोधला आहे व या सर्व चॅनल्सच्या प्रमुखांना मी मराठीतुनच ई-मेल्स पाठवायचा निर्णय घेतला आहे. रोज एक ई-मेल प्रत्येकाला पाठवणार बघुया किती दिवसांत फरक पडतो. न पडल्यास सर्व मराठी लोकांनी अशा चॅनल्सना वठणीवर आणायला तयार असावे.
महाराष्ट्राततरी या सर्व चॅनल्सवर बहुतेक वेळा फक्त मराठी गाणीच वाजवावीत अशिही मागणी मी या पत्रांत करणार आहे.

        आजच पत्र रेडिओ मिर्चीच्या प्रमुखांना  श्री. श्रीराम किलंबी यांना त्यांच्या sriram.kilambi@timesgroup.com या ई-मेल पत्यावर पाठवीत आहे. श्री. किलंबी हे मुंबई स्टेशनचे प्रमुख आहेत.


मा. श्री. किलंबी साहेब.
        मी आपल्या रेडिओ मिर्चीचा एक श्रोता असुन माझ्या पहाण्यात असे आले आहे की आपल्या रेडिओ स्टेशनवर, रेडिओ स्टेशन मुंबईत असुनही मराठी गाण्यांवर अन्याय होत आहे.
        आपण या ई-मेलची दखल घेवून त्वरीत व कमीतकमी दिवसाचे बारा तास मराठी गाणे वाजवावेत हि विनंती.
         आपण या विनंतीचा मान राखाल ही अपेक्षा.

 दिनेश.

ता. क. आपल्याला लिहीलेल्या ई-मेलला मी माझ्या ब्लॉगवर सुद्धा प्रसिद्धी देत आहे याची नोंद घ्यावी. आपल्या कडून उत्तर आल्यास त्याला सुद्धा याच ब्लॉगवर प्रसिद्धी दिली जाईल.



मंगळवार, ४ मे, २०१०

नालायक शासन : निर्लज्ज प्रशासन : हतबल जनता : बेठबिगार कर्मचारी.

                   कालपासुन मुंबईत लोकलचे मोटरमन संपावर गेले. मोटरमनला या आंदोलनासाठी दोष देणे योग्य होणार नाही. त्यांच्या योग्य मागण्यांसाठी प्रशासनाला भरपुर वेळ दिला असतानाही प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष दिले नाही त्याचा परिणाम आपण काल पासुन अनुभवतो आहेच.
                   कोणत्याही मागण्याकडे वेळीच लक्ष न देणे हे नालायक राजकारण्यांना चांगले जमते. याचा परिणाम समाजात वाढत चाललेल अराजकाच्या रुपाने आपण सर्व चांगल्या प्रकारे जाणतो.
                   काल प्राध्यापक संपावर गेले होते, आज मोटरमन संपावर गेलेत उद्या शासकीय तंत्रनिकेतन अधिव्याख्यात्यांसोबत आणखी कोणी संपावर गेलेत तर दोष त्या कर्मचार्‍यांना कसा देणार ?
                   शासन व प्रशासनाने या प्रकारच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

सोमवार, २९ मार्च, २०१०

लाचारिचा धडा.

       तस मला भेटणार्‍या प्रत्येकाकडुन काहिना काही शिकायला आवडते, अट एकच आहे, ज्याच्या कडून शिकायच आहे तो त्या कलेत माहीर असायला हवा.
       आज मला "लाचारी" ही कला शिकायला मिळाली.  माझा या कलेतला गुरुपण या कलेत माहीर होता.
        आज संध्याकाळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होता व त्याला आपले मुख्यमंत्री महोदय येतील अशी माझी अपेक्षा होती कारण ते सन्माननीय पाहूणे म्हणून अपेक्षीत होते. तसेच या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन पण येणार होते.
        अमिताभ बच्चन कार्यक्रमाला असतांना मुख्यमंत्री तेथे गेले असते तर त्यांना कदाचित "मॅडमच्या" नाराजीचा सामना करावा लागला असता. त्यामूळे समस्त मराठी जनांना डावलून त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारणे पसंत केले.
          मराठी साहित्यीकांच्या दिवाळीला मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण असल्यामुळे उपस्थीत असाव हा संकेत त्यांनी ज्या लाचारपणे मोडला ह्या पेक्षा अधिक लाचारी कुठेच बघायला मिळाली नाही व कदाचीत मिळणार पण नाही.
        पण मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून व स्व्त:च एकही वाक्य मराठीत न उच्चारता श्री. अमिताभ बच्चन यांनी मात्र सर्व मराठी जनांना मात्र सहजच जिंकल हेही येथे नमूद करावस वाटत.

शुक्रवार, २६ मार्च, २०१०

राष्ट्रवादी ???

          संभाजीनगर महापालीकेच्या निवडणूका लौकरच होणार आहेत सर्वच पक्ष आपापले उमेदवार रिंगणात उतरवताहेत.
           या निवडणुकीत स्वत:ला निधर्मी म्हणवणारे दोन पक्ष सर्वांना माहीतच आहेत. निधर्मी म्हणजे कोणताही धर्म (माणुसकिचाही) न मानणारे अशी माझी स्वत:ची व्याख्या आहे.
         या निवडणूकीत स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवणार्‍या (व राष्ट्रा बद्दलचे कर्तव्य न जाणणार्‍या) पक्षाने आपला एक कदिर मौलाना नावाचा उमेदवार उभा केला आहे. सोबत त्या उमेदवाराने आपले पत्रक कसे छापले आहे त्याची एक झलक आपल्यासाठी देत आहे.
          ही झलक वाचल्यावर आपल्याला काय वाटते हे कृपया टिप्पणीत कळवणे.

शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०१०

सर्व प्रश्न सुटलेत काय ...... ?

              आज ठरल्या प्रमाणे माय नेम इज..... प्रदर्शित करायचा प्रयत्न झाला. सिनेमा बघणार्‍यांच्या यादित राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री  आपल्या सार्‍या फौजफाट्या सिनेमा बघायला गेल्याचे संध्याकाळच्या बातम्यात कळले. माझा आनंद गगनात मावेना.
              या बातम्यांप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना आपल्या फौजफाट्यासह सिनेमा बघायला वेळ मिळाला याचा अर्थ त्यांना इतर कोणतेही काम राहिले नसावे, याचाच दूसरा अर्थ राज्याचे सर्व प्रश्न सुटले असावेत.
                राज्यातील जनता आता अत्यंत आनंदाने वावरताना दिसेल असे मानायला हरकत नसावी. शेतकर्‍यांनी आता आत्महत्या करु नये. दहावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीचा प्रवेश कसा मिळेल याची काळजी करु नये. लोकांनी महागाई वाढल्याचे तुणतुणे वाजवू नये. मुंबईतील गर्दी वाढत चालल्याचे जुनेच रडगाणे मुंबई करांनी गाऊ नये.
                कारण, आता माय नेम इज ...... ठरल्या प्रमाणे प्रदर्शित झाला आहे हो..... !!!

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१०

राज्याच्या मंत्र्यांकडे लाखो रुपयांची पाणीपट्टी थकीत.

आजच्या सर्वच वर्तमान पत्रांनी मुखपृष्ठावर "राज्यातील मंत्र्यांकडे" थकीत असलेल्या पाणीपट्टी बद्दलची बातमी छापली आहे.
अशा या मंत्र्यांनी जनतेला यातुन एक संदेश दिलेला आहे. आपल्या कडे कोणतीही थकबाकी असल्यास ती द्यायची गरज नाही. कोणी मागायला आल्यास या मंत्र्यांकडे बोट दाखवा व त्यांच्याच सांगण्याप्रमाणे आपण ही थकबाकी देत नसल्याचे सांगा.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच यातील ५ लाख २९ हजार एवढी थकबाकी आहे. त्यांच्या मंत्रालयात विचारणा केली असता असे कळले की साहेब फार व्यस्त आहेत. मला वाटते ही थकबाकी भरायला साहेबांना रांगेत उभे रहावे लागते कि काय ? आम्हा सामान्य माणसां सारखे !

रविवार, २४ जानेवारी, २०१०

जय हो !



भारत सरकारच्या एका मंत्रालयाने दिलेली सोबतची जाहिरात बघा.

महिला व बाल विकास मंत्रालयाने दिलेली ही जाहिरात वादग्रस्त झाली आहे कारण यात पाकिस्तानचे पूर्व हवाईदल प्रमुख तन्वीर महमूद अहमद याचा फोटो पण दिलेला आहे. हिरव्यांचा कायम लांगूलचालन करणारे आपले सरकार किती लाचार असु शकते याचा हा आणखी एक पुरावा समजावा कि / वा भारतातले आदर्श संपल्याने आता आदर्शही आयात करावे लागलेयत ?
भारतीय सैन्यदलात असा कोणी सापडला नाही काय व आयात करावासा वाटला तोही थेट पाकिस्तानातुन !

भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails