स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !

बुधवार, १६ जून, २०१०

मराठी.

मराठीचा मुद्दा हा रजकीय असुच शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष हा मुद्दा पळवू शकत नाही. मराठी माणसे दाक्षिण्यात्यांसारखे कायम राजकारणाचा विचार करित नाही पण आपसात वागतांना मात्र एखाद्या राजकारण्यासारखे वागतात. हेच कारण आहे आज प्रत्येक जण उठतो व मराठी मराठी करित सुटतो.
मी गेली बरिच वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी मराठी या मुद्यावर लिहीत आलो आहे. पण काही मराठी ब्लॉग्स वर मराठी या विषयावर वाचल्यावर माझ्या डोक्यात ही पोस्ट लिहायचा विचार आला. या लेखाचा उद्देश कोणालाही कमी लेखण्याचा किंवा डिवचण्याचा नाही.
मी भारतात बर्‍याच राज्यांमधे फिरलेलो आहे. फिरतांना माझी काही निरिक्षणे खालील प्रमाणे आहेत मराठी वाचकांनी प्रामाणीक पणे यांचा विचार करुन यापुढे निदान महाराष्ट्रात तरी केवळ मराठीतच संवाद साधावा.
इतर राज्यातील निरिक्षणे :
१. सर्व राज्यात तेथील लोकांना त्यांच्या भाषेचा अभिमान असतो व ते वागताना तसे दाखवतात.
२. तेथील बहुतेक व्यवहार स्थानीक भाषेतच केले जातात.
३. त्यांचे स्थानीक दोन माणसे भेटलीत तरिही ते आपल्या उपस्थितीत सुद्धा त्यांच्या भाषेतच बोलतात.
४. सर्वच परराज्यातील माणसे आपल्या भाषेच्या माणसांना कोणत्याही बाबतीत अग्रक्रम देतात.

मी गेली काही दिवस मुंबईतील  FM चॅनेल्सवर लक्ष ठेवून आहे. बहुतेक चॅनल्सवर मराठी गाणी वाजवण्यात येत नाहीत किंवा त्यांच्या वेळा मराठी माणसांना सोयीच्या नाहीत. यावर उपाय मी माझ्या साठी शोधला आहे व या सर्व चॅनल्सच्या प्रमुखांना मी मराठीतुनच ई-मेल्स पाठवायचा निर्णय घेतला आहे. रोज एक ई-मेल प्रत्येकाला पाठवणार बघुया किती दिवसांत फरक पडतो. न पडल्यास सर्व मराठी लोकांनी अशा चॅनल्सना वठणीवर आणायला तयार असावे.
महाराष्ट्राततरी या सर्व चॅनल्सवर बहुतेक वेळा फक्त मराठी गाणीच वाजवावीत अशिही मागणी मी या पत्रांत करणार आहे.

        आजच पत्र रेडिओ मिर्चीच्या प्रमुखांना  श्री. श्रीराम किलंबी यांना त्यांच्या sriram.kilambi@timesgroup.com या ई-मेल पत्यावर पाठवीत आहे. श्री. किलंबी हे मुंबई स्टेशनचे प्रमुख आहेत.


मा. श्री. किलंबी साहेब.
        मी आपल्या रेडिओ मिर्चीचा एक श्रोता असुन माझ्या पहाण्यात असे आले आहे की आपल्या रेडिओ स्टेशनवर, रेडिओ स्टेशन मुंबईत असुनही मराठी गाण्यांवर अन्याय होत आहे.
        आपण या ई-मेलची दखल घेवून त्वरीत व कमीतकमी दिवसाचे बारा तास मराठी गाणे वाजवावेत हि विनंती.
         आपण या विनंतीचा मान राखाल ही अपेक्षा.

 दिनेश.

ता. क. आपल्याला लिहीलेल्या ई-मेलला मी माझ्या ब्लॉगवर सुद्धा प्रसिद्धी देत आहे याची नोंद घ्यावी. आपल्या कडून उत्तर आल्यास त्याला सुद्धा याच ब्लॉगवर प्रसिद्धी दिली जाईल.



भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails