स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !

मंगळवार, ४ मे, २०१०

नालायक शासन : निर्लज्ज प्रशासन : हतबल जनता : बेठबिगार कर्मचारी.

                   कालपासुन मुंबईत लोकलचे मोटरमन संपावर गेले. मोटरमनला या आंदोलनासाठी दोष देणे योग्य होणार नाही. त्यांच्या योग्य मागण्यांसाठी प्रशासनाला भरपुर वेळ दिला असतानाही प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष दिले नाही त्याचा परिणाम आपण काल पासुन अनुभवतो आहेच.
                   कोणत्याही मागण्याकडे वेळीच लक्ष न देणे हे नालायक राजकारण्यांना चांगले जमते. याचा परिणाम समाजात वाढत चाललेल अराजकाच्या रुपाने आपण सर्व चांगल्या प्रकारे जाणतो.
                   काल प्राध्यापक संपावर गेले होते, आज मोटरमन संपावर गेलेत उद्या शासकीय तंत्रनिकेतन अधिव्याख्यात्यांसोबत आणखी कोणी संपावर गेलेत तर दोष त्या कर्मचार्‍यांना कसा देणार ?
                   शासन व प्रशासनाने या प्रकारच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails