स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !

सोमवार, १९ जानेवारी, २००९

अजुन एक दिन !!! दीन ???

भरतातले प्रश्न जणु काही सुटलेतच. आता भारत सरकार २४ जानेवारी हा राष्ट्रीय कन्या (Girl Child Day ) म्हणुन साजरा करणार आहे !!!
शिक्षक दिन साजरा करता करता शिक्षक दीन झाला. शिक्षकाला आपल्या हक्कांसाठी भिक्षा मागाव्या लागणार्‍या देशात आता कन्याही दीन होणार.
महिला दिवस साजरा होतो पण आज कोणतीही महिला रस्त्याने सुरक्षीत फिरु शकत नाही, बाहेर गेलेली आपली मुलगी घरी परत येत पर्यंत घरच्यांचा जीव टांगतीवर असतो. या अर्थाने त्याही दीनच.
कामगार दिन मोठ्या थाटामाटाने साजरा होतो, पण कामगारांचे हाल काय वर्णावे.
अजुन कोण कोण दीन होणार ? देवच जाणे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails