स्वा. सावरकर सागरी सेतू .
कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.
पुरा देश गांधी - नेहरु के नाम.
भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.htmlव म्हणा-
जय हो !
आज ठरल्या प्रमाणे माय नेम इज..... प्रदर्शित करायचा प्रयत्न झाला. सिनेमा बघणार्यांच्या यादित राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आपल्या सार्या फौजफाट्या सिनेमा बघायला गेल्याचे संध्याकाळच्या बातम्यात कळले. माझा आनंद गगनात मावेना.
या बातम्यांप्रमाणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्र्यांना आपल्या फौजफाट्यासह सिनेमा बघायला वेळ मिळाला याचा अर्थ त्यांना इतर कोणतेही काम राहिले नसावे, याचाच दूसरा अर्थ राज्याचे सर्व प्रश्न सुटले असावेत.
राज्यातील जनता आता अत्यंत आनंदाने वावरताना दिसेल असे मानायला हरकत नसावी. शेतकर्यांनी आता आत्महत्या करु नये. दहावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीचा प्रवेश कसा मिळेल याची काळजी करु नये. लोकांनी महागाई वाढल्याचे तुणतुणे वाजवू नये. मुंबईतील गर्दी वाढत चालल्याचे जुनेच रडगाणे मुंबई करांनी गाऊ नये.
कारण, आता माय नेम इज ...... ठरल्या प्रमाणे प्रदर्शित झाला आहे हो..... !!!
आजच्या सर्वच वर्तमान पत्रांनी मुखपृष्ठावर "राज्यातील मंत्र्यांकडे" थकीत असलेल्या पाणीपट्टी बद्दलची बातमी छापली आहे.
अशा या मंत्र्यांनी जनतेला यातुन एक संदेश दिलेला आहे. आपल्या कडे कोणतीही थकबाकी असल्यास ती द्यायची गरज नाही. कोणी मागायला आल्यास या मंत्र्यांकडे बोट दाखवा व त्यांच्याच सांगण्याप्रमाणे आपण ही थकबाकी देत नसल्याचे सांगा.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच यातील ५ लाख २९ हजार एवढी थकबाकी आहे. त्यांच्या मंत्रालयात विचारणा केली असता असे कळले की साहेब फार व्यस्त आहेत. मला वाटते ही थकबाकी भरायला साहेबांना रांगेत उभे रहावे लागते कि काय ? आम्हा सामान्य माणसां सारखे !
भारत सरकारच्या एका मंत्रालयाने दिलेली सोबतची जाहिरात बघा.
महिला व बाल विकास मंत्रालयाने दिलेली ही जाहिरात वादग्रस्त झाली आहे कारण यात पाकिस्तानचे पूर्व हवाईदल प्रमुख तन्वीर महमूद अहमद याचा फोटो पण दिलेला आहे. हिरव्यांचा कायम लांगूलचालन करणारे आपले सरकार किती लाचार असु शकते याचा हा आणखी एक पुरावा समजावा कि / वा भारतातले आदर्श संपल्याने आता आदर्शही आयात करावे लागलेयत ?
भारतीय सैन्यदलात असा कोणी सापडला नाही काय व आयात करावासा वाटला तोही थेट पाकिस्तानातुन !