स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !

मंगळवार, १६ जून, २००९

शाब्बास नाशिकर.

नाशिककरांच्या या कृतीला राजकारण्यांच्या गुंडगिरीला सामान्य जनतेने देलेले उत्तर असेच म्हणावे लागेल. निवडणूका आल्यावरच अंगात विनम्रता शिरते व निवडून आल्यावर सामान्य जनांना गुंडांच्या हाती सोपवायचे असे हे राजकारण्यांचे चाळे जनता फार काळ सहन करणार नाही हे राजकारण्यांनी लक्षात ठेवावे.
समस्त नाशिककरांचे अभिनंदन !

बुधवार, १० जून, २००९

फ्क्त ४६ पैसे कर्जमाफी !

लोकमतमधिल खालील बातमी वाचा
शेतकर्‍याला १०००० रुपयाचे कर्ज असताना फक्त ४६ पैसे कर्ज माफी मिळाली ! शासनाचे आभार ! बाकी पैसे कुठे गेलेत हे जनता पुढील निवडणुकी पर्यंत नक्किच विसरणार ! व आपल्यालाच निवडून देणार !

शनिवार, २१ मार्च, २००९

जय हो.

भिवंडी, कल्याण, मालेगाव, सोलापुर आणि आता नविन राबोडी, ठाणे.
कल्याणला एका लहान घटनेवरून दंगल पेटली होती. परवा तशाच एका क्षुल्लक घटने वरुन राबोडी पेटले. एका रिक्षा व मारुती व्हॅनची टक्कर, दंगलीला कारण ठरते, काय हा योगायोग आहे ?
Rediff.com ने दिलेली बातमी वाचा 180 Kerala youth ready to wage LeT's war .
कॉंग्रेसने भारतभर केलेली ही घाण कोण साफ करणार ? राबोडीत दंगल झाल्यावर पोलीस महासंचालक दंगलग्रस्त भागास भेट देऊन एका विशिष्ट समाजातीलच लोकांशी चर्चा करतात याचा अर्थ काय आहे ? (वाचा लोकसत्ता ठाणे वृतांत १९/०३/२००९, प्रस्तुत फोटो वेब आवृत्तीत दिलेला नाही.) दंगल करण्यार्‍यांशिच चर्चा, काय हा खेळ आहे ? महासंचालकांना दुसर्‍या समाजातील लोकांना भेट द्याविशी वाटत नाही कां ? कि त्यांचे हात कोणत्या आदेशाने बांधलेले आहेत ?
मतदार राजा जागा हो, अन्यथा तुझे हात पाय सगळे बांधून तोंडावर बुक्क्यांचा मार बसेल. असले फाजील लाड करणार्‍या पक्षाला येत्या निवडणुकीत हद्दपार करा, आणि या देशाला वाचवा. शपथ आहे तुम्हाला भारत मातेची.
भारत माता तुम्हाला कधिही माफ करणार नाही तुमचा निर्णय चुकला तर किंवा तुम्ही मतदानाला गेला नाही तर.

भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails