स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !

गुरुवार, ८ जुलै, २०१०

महाराष्ट्राची प्रगती !

          सर्वांना माहितच आहे महाराष्ट्रात आघाडी सत्तेवर आहे. हो आघाडी म्हणजेच कॉंग्रेस व (अ)राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी. सत्ता  आघाडीची असली तरी सर्व "मलईदार" खाते (अ)राष्ट्रवादी कडे आहेत ही कॉंग्रेसची पोटदूखी.
          महाराष्ट्राची या आघाडीमुळे फारच प्रगति होत आहे असे आघाडीतल्या घटक पक्षांचे म्हणणे आहे, जे आम्हाला १०० % मान्य आहे. आघाडिच कामच तसे चाललय तर आम्हाला मान्यच कराव लागणार ना ! आमचाही नाईलाज आहे !
           या आघाडीने बरेच प्रश्न सहजच सोडवलेत आणि आम्हाला याचे खरच फार्फार कौतुक वाटते. उदाहरणार्थ काही प्रश्न कसे सोडवलेत ते बघुया.
१. शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी झाल्यात कारण आपण आत्महत्या केल्यावर आपल्या परिवाराची फरफट फारच वाढते हे त्या शेतकर्‍यांना कळले. अन्यथा मदत मिळवण्यासाठी या आत्महत्या वाढल्या असत्या.
२.   पूर्णवेळ शिक्षणमंत्री नेमला असता तर कदाचीत दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न कैक पटिने वाढला असता, त्यामुळे शिक्षण मंत्री नेमलाच नाही. हे सरकार एवढे समर्थ असताना नागरिकांनी शिकायची काय गरज आहे ? त्याच प्रमाणे उच्च  व तंत्रशिक्षण मंत्री आपले खाते यशस्वीपणे सांभाळतायत. सहावा वेतन आयोग दिल्यास अभियांत्रिकी शिक्षक वर्गात समाधानकारक शिकवतील विद्यार्थी उत्तिर्ण झाल्यावर अभियंते मोठ्ठ्या प्रमाणात वाढतील व समाजात बेकार अभियंते वाढतील त्यापेक्षा त्यांना वेतन आयोग न दिल्यास नाराजीने शिकवणे थांबेल बेकार अभियंते कमी रहातील व नागरिक सामान्यच रहातील.
३.  महाराष्ट्रात धर्मांध म्लेच्छांकडून बर्‍याच दंगली घडवण्यात आल्या. याचा ईतिहास सर्वांनाच चांगला माहित आहे. या दंगलींना हिंदूंकडून विरोध व्हायचा, हिंदूच जर विरोध करण्यास असमर्थ ठरले तर ? विरोध न झाल्यामुळे दंगली कमी झाल्या व म्लेच्छ कसेही वागायला मोकळे झालेत व दंगली कमी झाल्या.
    आता काय आपले पॉवर साहेब तर ICC चे अध्यक्ष झाले. साहेब महाराष्ट्राचे असल्याने महाराष्ट्र नं १ झालाच ना ?
तर रडू नका परत फूडच्या निवडणुकीत याईलेच निवडून आना वा आपले प्रस्न विसरुन जा साहेबांनो.

बुधवार, १६ जून, २०१०

मराठी.

मराठीचा मुद्दा हा रजकीय असुच शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष हा मुद्दा पळवू शकत नाही. मराठी माणसे दाक्षिण्यात्यांसारखे कायम राजकारणाचा विचार करित नाही पण आपसात वागतांना मात्र एखाद्या राजकारण्यासारखे वागतात. हेच कारण आहे आज प्रत्येक जण उठतो व मराठी मराठी करित सुटतो.
मी गेली बरिच वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी मराठी या मुद्यावर लिहीत आलो आहे. पण काही मराठी ब्लॉग्स वर मराठी या विषयावर वाचल्यावर माझ्या डोक्यात ही पोस्ट लिहायचा विचार आला. या लेखाचा उद्देश कोणालाही कमी लेखण्याचा किंवा डिवचण्याचा नाही.
मी भारतात बर्‍याच राज्यांमधे फिरलेलो आहे. फिरतांना माझी काही निरिक्षणे खालील प्रमाणे आहेत मराठी वाचकांनी प्रामाणीक पणे यांचा विचार करुन यापुढे निदान महाराष्ट्रात तरी केवळ मराठीतच संवाद साधावा.
इतर राज्यातील निरिक्षणे :
१. सर्व राज्यात तेथील लोकांना त्यांच्या भाषेचा अभिमान असतो व ते वागताना तसे दाखवतात.
२. तेथील बहुतेक व्यवहार स्थानीक भाषेतच केले जातात.
३. त्यांचे स्थानीक दोन माणसे भेटलीत तरिही ते आपल्या उपस्थितीत सुद्धा त्यांच्या भाषेतच बोलतात.
४. सर्वच परराज्यातील माणसे आपल्या भाषेच्या माणसांना कोणत्याही बाबतीत अग्रक्रम देतात.

मी गेली काही दिवस मुंबईतील  FM चॅनेल्सवर लक्ष ठेवून आहे. बहुतेक चॅनल्सवर मराठी गाणी वाजवण्यात येत नाहीत किंवा त्यांच्या वेळा मराठी माणसांना सोयीच्या नाहीत. यावर उपाय मी माझ्या साठी शोधला आहे व या सर्व चॅनल्सच्या प्रमुखांना मी मराठीतुनच ई-मेल्स पाठवायचा निर्णय घेतला आहे. रोज एक ई-मेल प्रत्येकाला पाठवणार बघुया किती दिवसांत फरक पडतो. न पडल्यास सर्व मराठी लोकांनी अशा चॅनल्सना वठणीवर आणायला तयार असावे.
महाराष्ट्राततरी या सर्व चॅनल्सवर बहुतेक वेळा फक्त मराठी गाणीच वाजवावीत अशिही मागणी मी या पत्रांत करणार आहे.

        आजच पत्र रेडिओ मिर्चीच्या प्रमुखांना  श्री. श्रीराम किलंबी यांना त्यांच्या sriram.kilambi@timesgroup.com या ई-मेल पत्यावर पाठवीत आहे. श्री. किलंबी हे मुंबई स्टेशनचे प्रमुख आहेत.


मा. श्री. किलंबी साहेब.
        मी आपल्या रेडिओ मिर्चीचा एक श्रोता असुन माझ्या पहाण्यात असे आले आहे की आपल्या रेडिओ स्टेशनवर, रेडिओ स्टेशन मुंबईत असुनही मराठी गाण्यांवर अन्याय होत आहे.
        आपण या ई-मेलची दखल घेवून त्वरीत व कमीतकमी दिवसाचे बारा तास मराठी गाणे वाजवावेत हि विनंती.
         आपण या विनंतीचा मान राखाल ही अपेक्षा.

 दिनेश.

ता. क. आपल्याला लिहीलेल्या ई-मेलला मी माझ्या ब्लॉगवर सुद्धा प्रसिद्धी देत आहे याची नोंद घ्यावी. आपल्या कडून उत्तर आल्यास त्याला सुद्धा याच ब्लॉगवर प्रसिद्धी दिली जाईल.



मंगळवार, ४ मे, २०१०

नालायक शासन : निर्लज्ज प्रशासन : हतबल जनता : बेठबिगार कर्मचारी.

                   कालपासुन मुंबईत लोकलचे मोटरमन संपावर गेले. मोटरमनला या आंदोलनासाठी दोष देणे योग्य होणार नाही. त्यांच्या योग्य मागण्यांसाठी प्रशासनाला भरपुर वेळ दिला असतानाही प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष दिले नाही त्याचा परिणाम आपण काल पासुन अनुभवतो आहेच.
                   कोणत्याही मागण्याकडे वेळीच लक्ष न देणे हे नालायक राजकारण्यांना चांगले जमते. याचा परिणाम समाजात वाढत चाललेल अराजकाच्या रुपाने आपण सर्व चांगल्या प्रकारे जाणतो.
                   काल प्राध्यापक संपावर गेले होते, आज मोटरमन संपावर गेलेत उद्या शासकीय तंत्रनिकेतन अधिव्याख्यात्यांसोबत आणखी कोणी संपावर गेलेत तर दोष त्या कर्मचार्‍यांना कसा देणार ?
                   शासन व प्रशासनाने या प्रकारच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.

भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails