स्वा. सावरकर सागरी सेतू .
कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.
पुरा देश गांधी - नेहरु के नाम.
भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.htmlव म्हणा-
जय हो !
कालपासुन मुंबईत लोकलचे मोटरमन संपावर गेले. मोटरमनला या आंदोलनासाठी दोष देणे योग्य होणार नाही. त्यांच्या योग्य मागण्यांसाठी प्रशासनाला भरपुर वेळ दिला असतानाही प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष दिले नाही त्याचा परिणाम आपण काल पासुन अनुभवतो आहेच.
कोणत्याही मागण्याकडे वेळीच लक्ष न देणे हे नालायक राजकारण्यांना चांगले जमते. याचा परिणाम समाजात वाढत चाललेल अराजकाच्या रुपाने आपण सर्व चांगल्या प्रकारे जाणतो.
काल प्राध्यापक संपावर गेले होते, आज मोटरमन संपावर गेलेत उद्या शासकीय तंत्रनिकेतन अधिव्याख्यात्यांसोबत आणखी कोणी संपावर गेलेत तर दोष त्या कर्मचार्यांना कसा देणार ?
शासन व प्रशासनाने या प्रकारच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
तस मला भेटणार्या प्रत्येकाकडुन काहिना काही शिकायला आवडते, अट एकच आहे, ज्याच्या कडून शिकायच आहे तो त्या कलेत माहीर असायला हवा.
आज मला "लाचारी" ही कला शिकायला मिळाली. माझा या कलेतला गुरुपण या कलेत माहीर होता.
आज संध्याकाळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होता व त्याला आपले मुख्यमंत्री महोदय येतील अशी माझी अपेक्षा होती कारण ते सन्माननीय पाहूणे म्हणून अपेक्षीत होते. तसेच या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन पण येणार होते.
अमिताभ बच्चन कार्यक्रमाला असतांना मुख्यमंत्री तेथे गेले असते तर त्यांना कदाचित "मॅडमच्या" नाराजीचा सामना करावा लागला असता. त्यामूळे समस्त मराठी जनांना डावलून त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारणे पसंत केले.
मराठी साहित्यीकांच्या दिवाळीला मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण असल्यामुळे उपस्थीत असाव हा संकेत त्यांनी ज्या लाचारपणे मोडला ह्या पेक्षा अधिक लाचारी कुठेच बघायला मिळाली नाही व कदाचीत मिळणार पण नाही.
पण मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहून व स्व्त:च एकही वाक्य मराठीत न उच्चारता श्री. अमिताभ बच्चन यांनी मात्र सर्व मराठी जनांना मात्र सहजच जिंकल हेही येथे नमूद करावस वाटत.
संभाजीनगर महापालीकेच्या निवडणूका लौकरच होणार आहेत सर्वच पक्ष आपापले उमेदवार रिंगणात उतरवताहेत.
या निवडणुकीत स्वत:ला निधर्मी म्हणवणारे दोन पक्ष सर्वांना माहीतच आहेत. निधर्मी म्हणजे कोणताही धर्म (माणुसकिचाही) न मानणारे अशी माझी स्वत:ची व्याख्या आहे.
या निवडणूकीत स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवणार्या (व राष्ट्रा बद्दलचे कर्तव्य न जाणणार्या) पक्षाने आपला एक कदिर मौलाना नावाचा उमेदवार उभा केला आहे. सोबत त्या उमेदवाराने आपले पत्रक कसे छापले आहे त्याची एक झलक आपल्यासाठी देत आहे.
ही झलक वाचल्यावर आपल्याला काय वाटते हे कृपया टिप्पणीत कळवणे.