स्वा. सावरकर सागरी सेतू .

कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.

पुरा देश गांधी - नेहरु के नाम.

भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.html

व म्हणा-

जय हो !

शनिवार, १० ऑक्टोबर, २००९

तुम्हाला काय वाटतय ?

आज असाच रिकामा बसुन होतो म्हटले चला बघूया हिंदी ब्लॉग विश्वात काय चाललय. तर खालील ब्लॉग सहजच हाती लागला. वाचल्यावर विश्वासच बसेना कि असेही काही असु शकते. माझतर डोकच चालेना, म्हटल चला आपल्या वाचकांना विचारुन बघूया त्यांना काय वाटतय. तर हा हिंदी ब्लॉग वाचल्यावर सांगा तुम्हाला काय वाटतय.
आपल्याला हिंदी कळत नसेल तर याच भाषांतर मी लगेच पोस्ट करायच्या विचारात आहे थोडी वाट बघायला लागेल इतकच.
हिंदी ब्लॉगची लिंक : http://mahashaktigroup.bharatuday.in/2009/10/blog-post_08.html



आज की कांग्रेस इतनी गिर चुकी है

अभी पिछले दिनों आँध्रप्रदेश के मुख्यमंत्री y s रेड्डी की मौत विमान दुर्घटना में हो गई.सभी चेनल्स में कहा गया की उनकी मौत के दुख में 462 लोगो ने आत्महत्या कर ली""आश्चर्य होता है न आज के समय में किसी नेता के लिए इतना प्यार देखकर!!! लेकिन बाद में मालूम पड़ा की ये प्यार नेता के लिए नहीं बल्कि पैसे के लिए था मतलब की कांग्रेस सरकार ने देश को जितने भी लोगो को खुदख़ुशी करने वालों में गिनाया था वो सभी खुदखुशी के कारण नहीं बल्कि अपनी स्वाभाविक मौत मरे थे"जी हां एक सनसनीखेज़ खुलासे में ये बात सामने आई है की मरने वाले लोगो के घर वालो को सरकार ने 5000-5000 Rs. दिए थे और बदले में उनलोगों को ये बोलना था की "मरने वाला आदमी अपनी स्वाभाविक मौत नहीं मरा बल्कि उसने मुख्यमंत्री के गम में आत्महत्या की है."शर्म आती है ये बाते सुन-सुन कर की आज की कांग्रेस इतनी गिर चुकी है की लोगो की मौत पर भी राजनीति करने लगीकाश ये पैसा उन लोगो को मरने से पहले दिया जाता तो शायद वो जी जाते और सच्चे मन से श्रधांजलि देते…अगर आप मानते है कि ये बात देश में सभी को मालुम होनी चाहिए तो इसे अपने सभी दोस्तों तक पहुचाहिये"

शनिवार, ५ सप्टेंबर, २००९

शिक्षक दीन.

काय मथळा पाहून माझी चुक काढता ? अहो सत्य परिस्थीतीच तर मांडतोय.आज शिक्षक दीनच तर झालाय.
शिक्षकाने काही करतो म्हटले कि त्याला आठवते, अरे तो तर समाज घडवणारा प्राणी आहे त्याने भ्रष्टाचारापासुन चार हात लांब राहिले पाहिजे. त्याने शिकवण्या घेऊ नये ते समाजाला घातक आहे. शासनाने तर शिक्षकाच्या बायकोनेही शिकवण्या घेऊ नये व काय काय करु नये असा मध्यंतरी फतवा काढला होता.
असा हा समाजातला एक प्राणी. आज त्याचा पोळा, म्हणजे शिक्षक दिन. समस्त शिक्षक वर्गाला व मला घडवणार्‍या शिक्षकांना माझा नमस्कार.
अशा शिक्षकांना शिक्षक सेवक बनवुन बेठबिगारी करायला लावणार्‍या शासनाला तर माझा कोपर्‍यापासुन नमस्कार.
शिक्षक सेवक ही शासनाने नियमांना बगल देवून तयार केलेली नविन बेठबिगारी आहे, हे शासन अशा शिक्षकां कडून समाज घडवण्याची अपेक्षा कशी करते ? शाळेतील मुलांना मधल्या वेळात सकस अन्न पुरवण्याची योजनाही याच शिक्षकांच्या माथी मारण्यात येते. बिच्चारे शिक्षक.
शिक्षक सेवकाल तीन वर्षाने नियमीत करण्यात येते या दरम्यान होणार्‍या अर्थपुर्ण वाटाघाटी शासनाने विचारात घेतल्यात कां ?
विद्यापीठातील शिक्षकांना त्यांच्या मागण्यासाठी एक महिन्यापेक्षा जास्त काळ आपला संप चालवावा लागतो.
निवडणूका आल्याकी शिक्षकांना कामास लावणार.
तंत्रनिकेतनातल्या शिक्षकांना त्यांच्या थकबाकी साठी दोन वर्षापेक्षा जास्त काळ वाट बघावी लागते.
सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी शिक्षकांसाठी सर्वात शेवटी होते.
५ सप्टेंबर आला की आम्ही शिक्षक दिन साजरा करणार !
जय हो !!!

शनिवार, २२ ऑगस्ट, २००९

हरे राम !

गणेश चतुर्थीला हे काय हे रा म म्हणायच ? नाही हे राम या शासकिय अधिकार्‍यांच्या नावाने आहे.
थोड्या वेळापुर्वीच बातमी आली कि पनवेलला लागलेल्या बस आग प्रकरणाने एका विद्यार्थ्याचा बळी घेतला आहे.
या प्रकरणात बस चालक, मालक, मुलांचे पालक जितके दोषी आहेत तितकेच वाहतुक पोलीस व त्यांचे अधिकारी पण जबाबदार आहेत. वाहतुक पोलीस फक्त हप्ता खाण्यासाठीच नेमले आहेत काय असा प्रश्न पडावा इतकी अंधाधूंदी या विभागात आहे.
शासनाने म्हणजेच शासनाच्याच शिक्षण विभागाने शिक्षणाचे वाटॊळे केल्याचे आपल्या अनुभवाला आलेच असेल अन्यथा विद्यापीठ प्राध्यापकांचा आजही ४३ व्या दिवशी संपुष्टात न आलेला संप कधिच मिटला असता.
याच ब्लॉगवर तंत्रशिक्षण संचालकांनी मान्य केलेल्या पदोन्नतीचा लाभ संबंधित अधिव्याख्यातांना सुमारे वर्षभराने झाल्याचा उल्लेख मागे केला होता. त्यांची थकबाकी शासनाने आजही अडीच वर्षे उलटल्यावरही दिली नसल्याचे कळते.
पनवेल बस जळीत प्रकरणाशीच संबंधित अशिच एक घटना जोगेश्वरीत मागल्या वर्षी घडली होती, त्या संदर्भात लोकसत्तेत आलेली आजची बातमी वाचा.
गेल्या वर्षी जोगेश्वरी येथे ओम्नी व्हॅनला लागलेल्या आगीत काही विद्यार्थी होरपळल्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्य सरकारने स्कूल बसच्या बाबतीत नियमावली करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. परंतु, एक वर्ष झाल्यानंतरही या समितीला आपला अंतिम अहवाल तयार करण्यात अपयश आले आहे. अंतिम अहवालासाठी आवश्यक असलेली मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने दिरंगाई केल्याने हा अहवाल तयारच झाला नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे समितीने स्कूल बस कशी असावी याबाबतची तात्पुरती (कामचलाऊ) मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वीच तयार केली आहेत.परिवहन आयुक्त या समितीचे अध्यक्ष आहेत. इतर सदस्यांमध्ये शिक्षण सहसचिव, शिक्षण संचालक, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, जॉन कॅथड्रल स्कूलचे मुख्याध्यापक आणि सामाजिक कार्यकर्त्यां इंद्रायणी मालकाणी यांचा समावेश आहे. समितीच्या आतापर्यंत पाच बैठका झाल्या आहेत. समितीने स्कूल बसबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाकडे सोपविण्यात आली होती. मात्र, शिक्षण विभागाने त्याकडे डोळेझाक केल्याचे उघडकीस आले आहे.
यासारख्या इतर बातम्या.

भ्रष्टाचारा विरुद्ध आपण लढायला तयार होणार का ?

Related Posts with Thumbnails