स्वा. सावरकर सागरी सेतू .
कॉंग्रेसच्या लाचार शासनाने वरळी वांद्रे सागरी सेतूला मुंबईशी काहिही देणे - घेणे नसलेल्या राजीव गांधीचे नाव दिले.
सर्व मराठी बांधवांनी या सागरी सेतूला न चुकता स्वा. सावरकर सागरी सेतूच म्हणावे.
पुरा देश गांधी - नेहरु के नाम.
भारतात फक्त गांधी व नेहरु घराण्यांनीच काय तो त्याग केला आहे ? त्यामुळे फक्त त्यांच्याच नावाने योजना असतात. भारत सरकारच्या जवळ जवळ ४५० योजनांना गांधी - नेहरु घराण्यातल्या लोकांचीच नावे आहेत.
या योजनांची नावे वाचा-
http://www.hindujagruti.org/news/7449.htmlव म्हणा-
जय हो !
आर्थिक संकटामूळे पुर्वलक्षी प्रभावाने वेतनआयोग देण्यास अडचणी.
राज्य शासनाच्या कर्मचार्यांना अपेक्षीत असलेली व सहाव्या वेतन आयोगामूळे मिळणारी वेतन वाढ शासनकर्त्यांमूळे अडचणीत आली आहे हे या बातमीमूळे स्पष्ट होते.
राज्य आर्थिक संकटात कोणामूळे आल ? यासाठी जबाबदार कोण ? याचा निर्णय राज्य शासकिय कर्मचारी येत्या निवडणूकांमध्ये घेतीलच याची शासनकर्त्यांना जाणिव असावी.
विलासी राज्य कर्त्यांमूळे राज्याचे असे हाल झाले आहेत. राज्य करताना किती माया गोळा केली व कशी केली हेही जनतेला कळते.
आर्थिक संकटामूळेच पाचव्या वेतन आयोगाची २८ महिन्याची थकबाकी अजुनही या कर्मचार्यांना मिळालेली नाही. याचा राग या कर्मचार्यांच्या मनात अजुनही आहेच.
अशा घटना अगोदर घडलेल्या आहेत. आठ ते दहा मुलांना विकण्यात आल्याचे या बातमीत म्हटले आहे. हे सर्व घडे पर्यंत संबंधित यंत्रणा काय झोपल्या होत्या का ?
वाचकांनी बातमी प्रकाशात आणल्या बद्दल लोकसत्तेला फोन करून श्री. दिलीप शिंदे यांचे कौतुक करावे.
---------------------------------------------------------
दिलीप
शिंदे ठाणे, ३१ डिसेंबर
---------------------------------------------------------
रुग्णालयाचे साडेसात हजार रुपयांचे बिल देण्यास असमर्थ ठरलेल्या मातेला तिच्या नवजात बालकासह डॉक्टर पिता-पुत्रांनी अपहरण करून कोंडून ठेवल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी डॉक्टर पिता - पुत्रास आज सायंकाळी अटक केली आहे. रुग्णालयातून गायब करण्यात आलेल्या त्या दोन महिन्याच्या मुलाची विक्री करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याचा तपास केला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मांदरे यांनी दिली. डॉ. हरकिसन भन्साली आणि डॉ. अंकुश भन्साली अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत.वसई तालुक्यातील माणिकपूरच्या गावराई पाडय़ात राहणारी स्नेहा निलेश गावकर हिने अंबाडी रोडवरील अनुराधा हॉस्पिस्टलमध्ये २६ नोव्हेंबर रोजी मुलाला जन्म दिला. डॉ. हरकिसन भन्साली आणि डॉ. अंकुश भन्साली यांनी मातेची काळजी घेत चार दिवसांनी साडेसात हजार रुपयांचे बिल गावकर यांच्या हाती दिले. परंतू ही भरमसाट रक्कम भरण्याची आर्थिक क्षमता नसलेल्या तिच्या पतीने दीड हजार रुपये अदा केले. मात्र सर्व रक्कम भरल्याशिवाय डॉक्टरांनी त्यांना घरी सोडले नाही. अखेर १ डिसेंबर रोजी स्नेहाने मुलासह पळ काढून घर गाठले. या प्रकारामुळे डॉक्टर पिता-पुत्राने त्यांना शोधून काढले आणि त्यांना काही मंडळींच्या मदतीने घरातून पळवून आणले. काही दिवस राहिल्यानंतर एका रुग्णाच्या मोबाईलवरून स्नेहाने पतीला फोन करून डॉक्टरने आपल्या मुलाला मुलुंडमधील स्टीव्ह नावाच्या व्यक्तीला विकल्याची माहिती दिली. त्यात कोणीतरी हा डॉक्टर दलालामार्फत मुले विकतो, असे सांगितल्यानंतर घाबरलेल्या गावकरने श्रमजीवी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजय शिरोडकर यांना ही हकीगत सांगितली. त्यांनी याची तक्रार श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा शिवसेना उपनेते विवेक पंडित यांच्याकडे केली.पंडित यांनी अतिरिक्त पोलीस अधिक्षक महावरकर आणि उपअधिक्षक चौघुले यांच्याकडे धाव घेऊन पोलिसांच्या मदतीने रुग्णालयातून स्नेहाची सुटका केली. मात्र दोन महिन्याचा मुलगा रुग्णालयातून गायब झालेला होता. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. चौकशीनंतर माणिकपूर पोलिसांनी डॉक्टर पिता-पुत्रांवर खंडणीसाठी अपहरण करणे, त्यांना कोंडून ठेवणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. या डॉक्टरांनी यापूर्वी आठ ते दहा मुलांना विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावकर यांच्या मुलाची विक्री करण्यात आली की कसे हे तपासानंतर समजेल, असे मांदरे यांनी सांगितले.
अशोक चव्हाण, विलासराव देशमुख व पतंगराव कदम यांच्यावर विविध कारणांसाठी "कॅग"ने ठपका ठेवला आहे. यासंबंधिचे वृत्त सर्वच वर्तमानपत्रांमध्ये आज प्रकाषित झाले आहे.
जनतेला अंधारात ठेऊन या सत्ताधार्यांनी महाराष्ट्राची वाट लावली आहे. राज्य सरकार आपल्या कर्मचार्यांना त्यांच्या वेतनवाढीची थकबाकी वर्षानुवर्षे देण्यास कुचराई करित आहे याला कारण सर्वच कार्यालयात बोकाळलेला भ्रष्टाचार. पैसे द्या व आपले काम करुन घ्या हा नविन मंत्र झाला आहे. प्रत्येक विभागातील प्रमुखाला त्याचा कोटा ठरवून दिलेला आहे, तितके पैसे या भ्रष्ट मंत्र्यांना पोहचवावा लागतो.
सर्वच वाचकांना या द्वारे विनंती कि त्यांनी या भ्रष्टाचारा विरुद्ध चालवलेल्या चळवळीत साथ द्यावी व आपले अनुभव या ब्लॉगवर पाठवावेत. आपल्याला न्याय मिळावा या साठी आम्ही प्रयत्न करु.